घरताज्या घडामोडीऔरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव नामांतर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

औरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव नामांतर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात बैठकांचं सत्र सुरू आहे. ठाकरे सरकारने आज कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पहिलं म्हणजे औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

औरंगाबादचं नामांतर केल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तर उस्मानाबादचं नामांतरण धाराशीव करण्यात आलं आहे. या तिन्ही नामांतरावर सर्वांचं विशेष लक्ष लागलं होतं. मात्र, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय –

• औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)

• उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)

- Advertisement -

• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
(नगर विकास विभाग)

• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषि विभाग)

• कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)

• अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
(परिवहन विभाग)

• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

• विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
(नियोजन विभाग)

• निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय

( सामान्य प्रशासन विभाग)

• शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.
(महसूल विभाग)


हेही वाचा : तीन नामांतरावर शिवसेना ठाम, कॅबिनेटची बैठक वादळी ठरण्याची शक्यता


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -