घरमहाराष्ट्रपुणेपंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शरद पवार का उपस्थित होते? जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शरद पवार का उपस्थित होते? जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा

Subscribe

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा १ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान आणि पवार हे एकाच मंचावर असल्यामुळे विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’तील काही पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती. या कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीतवर राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा खुलासा केला.

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर उपस्थितीत यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “या पुरस्कार सोहळ्याला जाऊ नका, असे त्यांना कित्येकांनी सांगितले. पण ते कार्यक्रमाला जाऊन आले. या कार्यक्रमात काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे देखील हजर होते. त्यावर फार चर्चा झाली नाही. पण शरद पवारांबद्दल झाली. मला शरद पवारांचा स्वभाव माहिती आहे. ते कुठल्या ही अग्रलेखाने किंवा वैयक्तिक टीकेतून भूमिका बदलतील, हे शक्य नाही”, अशा शब्दात त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून ठाकरे गटावर निशाणा साधला.

- Advertisement -

शरद पवार वैयक्तिक द्वेष कधीच करत नाही

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ते पंतप्रधानांना वैचारिक विरोध कायम करत राहतील. पण वैयक्तिक द्वेष कधीच करणार नाही. मी माझ्या अंदाजाने ठरवले की, काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या लोकमान्य टिळकांबद्दल बोलायचे आणि लोकमान्य टिळक यांचे देश आणि काँग्रेससाठीचे योगदान यांच्यावर यांच्यावर ते बोलणार आहोत.”

हेही वाचा – शरद पवारांची पुण्यातील कार्यक्रमाला हजेरी, काँग्रेस नेत्याच्या विधानाने रंगल्या चर्चा

- Advertisement -

वाजपेयी सरकार पडण्यामागचा ‘तो’ किस्सा

या मुलाखतीत जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांचा अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील किस्सा सांगितला. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवारांचा दरवाजा हा कुणासाठी कधीच बंध नसतो. कारण, संवाद ही त्यांची मुख्य ताकद आहे आणि देशातील प्रत्येक पक्षाशी संवाद असणारे नेते हे शरद पवार आहेत. जेव्हा अटलबिहारी वाजपेयींच सरकार पडले. तेव्हा एका मतांचे गणित होते आणि हे एक मत कुणी फिरवले. कारण त्यांचा मायावतींशी संवाद होता. जर शरद पवारांना अजित पवारांनी फोन करून बोलले, तर देखील ते त्यांची भूमिका बदलणार नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -