घरमुंबईलिहिणाऱ्याचे तोंड काळे झाले - संजय राऊत

लिहिणाऱ्याचे तोंड काळे झाले – संजय राऊत

Subscribe

वर्षा बंगल्यावरील भिंतींवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वाक्यं लिहिण्यात आली आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिली नसली तरी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तापालट झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांना शासकीय बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांसाठी असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्याचे वाटप झाले आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगला खाली केला आहे. पण हा बंगला आता सत्ताधारी आणि विरोधक यांमध्ये वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. कारण या बंगल्यावरील भिंतींवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वाक्यं लिहिण्यात आली आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिली नसली तरी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करणारे विधान?

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “वर्षा बंगल्याच्या भिंतींवर काय लिहिले आहे. हे मी पाहिलेलं नाही. भिंतींवर लिहिण्यात आलेले मजकूर रंग मारुन मिटवता येतात. पण यामुळे हा मजकूर लिहिणाऱ्याचे तोंड मात्र काळे झाले आहे,” असे म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.

हेही वाचा – विखे पाटील भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -