घरमहाराष्ट्रविरोधकांमध्ये सावळागोंधळ, त्यांची भांबावलेली परिस्थिती; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

विरोधकांमध्ये सावळागोंधळ, त्यांची भांबावलेली परिस्थिती; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

Subscribe

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतल्या निर्णयांची माहिती दिली, तसेच विरोधकांवरही टीकास्त्र डागले आहे. विरोधकांमध्ये सगळा सावळा गोंधळ आहे. त्यांची भांबवलेली परिस्थिती आहे. महाविकास आघाडीत एक वाक्यता नाही हे आजच्या परिस्थितीवरून दिसून आले. ऐकण्याची पण मानसिकता ठेवली पाहिजे ती त्यांच्याकडे नव्हती, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे,

एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन वर्षाच्या अधिवेशन होऊ शकलं नाही आणि सरकार बदललं नसतं. यावर्षीही नसते झालं. कुठे तिकडे चायना, जपानमध्ये कुठे कोविड आला ना. पण, असो. खरं म्हणजे विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भवासियांची अपेक्षा असते की, या भागामधील प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे, जे प्रलंबित विषय आहे. ते मार्गी लागले पाहिजे आणि जो अनुशेष आहे तो भरून काढला पाहिजे. त्या दृष्टीने अधिवेशनाचे कामकाड दहा दिवस चाललं.

- Advertisement -

जास्तीच कामकाज अधिवेशनातून झालं. नुसत कामकाज नाही तर त्याचं फलित देखील आपण पाहतोय. विदर्भातील जे विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होते, सिंचन, विकासाचे विषय असतील.

पहिल्यांच १५ हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेण्यात आला, यामुळे कुठलाही गैरप्रकार होणार नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, मधले कोणी जे आहेत व्यापारी एजंट त्यांना बिलकुल कुठे संधी नाही. ही शेतकऱ्यांची भावना होती लोकांची भावना होती की बोनस मिळाला पाहिजे. मी सभागृहात देखील सांगितलं की, विरोधी पक्षाने काही लावून धरलं नव्हतं. परंतु, आम्हाला माहीत होतं की, धानाला बोनस दिला पाहिजे. गेल्या वर्षी दिला नव्हता. परंतु या वर्षी आपला जे सरकार आहे. सर्व सामान्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार या सरकारच्या माध्यमातून लोकांना जे पाहिजे ते देण्याचा मी प्रयत्न केलाय, असही मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

जे विषय नाहीत ते विषय उकरून काढायचे, सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, भ्रष्टाचार व अनियमित झाली आहे, राष्ट्रीय पुरुषांचा अपमान झाला अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करत होते. किंबहुना पोलिसी कारवाई त्याचा अतिरेक या सगळ्या चर्चा त्यांनी सभागृहामध्येपेक्षा जास्त बाहेर बोर्डवैगरे लावून केल्या. आज मी त्यांना त्यांच्या प्रश्नांवर उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण विरोधकांमध्ये सगळा सावळा गोंधळ आहे. भांबवलेली परिस्थिती आहे. एक वाक्याता नाही हे आजच्या परिस्थितीवरून दिसून आले. ऐकण्याची पण मानसिकता ठेवली पाहिजे ती त्यांच्याकडे नव्हती, अशी टीकाही त्यांनी विरोधी पक्षावर केली आहे.

दरम्यान, अतिशय चांगलं यशस्वीपणे अधिवेशन झालं. विदर्भाला मोठ्या प्रमाणावर आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू शकलो. त्यासाठी मी आम्ही सरकारच्या वतीने विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.


मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना उघडं पाडलं; अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -