घरमहाराष्ट्रमाझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

Subscribe

मला वाटलं सीएमपदाची खुर्ची हलतेय, मात्र ते मानेचं दुखणं होतं. कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलं ते अश्रू नाहीत. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेवून बसले होते, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबईः माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उद्धव ठाकरेंबरोबर युवा नेते आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

मी जिद्द सोडली नाही, जिद्द अजूनही कायम आहे. मेलो तरी सेना सोडणार नाही असे म्हणणारेही पळून गेलेत. मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो. कोण कसं वागलं यात मला जायचं नाही. मला वाटलं सीएमपदाची खुर्ची हलतेय, मात्र ते मानेचं दुखणं होतं. कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलं ते अश्रू नाहीत. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेवून बसले होते, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. बंडखोरांकडून सेना फोडण्याचं पाप करण्यात आलंय. माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं. आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन. एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?, नगरविकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली. संजय राठोडांवर वाईट आरोप झाले, मात्र त्यानंतरही मी त्यांना सांभाळलं, असा लेखाजोगाही त्यांनी वाचून दाखवला.

विठ्ठल-बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे. बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. आपलीच काही लोक घेऊन सेनेवर सोडण्यात आली. सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल. मला वीट आलाय, म्हणजे मी वीट हाणणारच, यांना ठेवून काय करू हे सारं भाजपने केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला जर भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे, मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण आहे, बाळासाहेबांसाठी माझ्याहून लाडकं अपत्य म्हणजे शिवसेना असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

- Advertisement -

हेही वाचाः बंडखोर आमदार पालघर पोलीस संरक्षणात सीमापार, पोलीस नियंत्रण कक्षाला होते इनपूट

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -